BMC Bharti 2025 मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) विभागाच्या अंतर्गत समाजविकास कक्षात “समाज विकास अधिकारी” या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर असून, एकूण 29 जागा उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2025 आहे आणि अर्ज फक्त ऑफलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.
BMC Bharti 2025 मुख्य भरती माहिती:
पदाचे नाव: समाज विकास अधिकारी (कंत्राटी)
एकूण जागा: 29
नोकरी ठिकाण: मुंबई
मानधन: दरमहा ₹30,000
भरती प्रक्रिया: थेट भरती (मुलाखत / दस्तऐवज तपासणीच्या आधारे)
अर्ज पद्धती: ऑफलाईन (प्रत्यक्ष किंवा टपालाने)
अर्ज अंतिम तारीख: २५ जून २०२५, संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रता व इतर अटी:
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) असणे आवश्यक.
वयोमर्यादा: १८ ते ४३ वर्षे दरम्यान (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय सवलती लागू)
अनुभव: सामाजिक क्षेत्रात किंवा NGO मध्ये किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
संगणक ज्ञान: MS-CIT किंवा MS Office, Word, Excel, PowerPoint यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
टंकलेखन: मराठी व इंग्रजी टायपिंगचा ३० शब्द प्रति मिनिटाचा प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य.
मराठी भाषेचे ज्ञान: दहावीमध्ये मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे अनिवार्य.
अर्ज कसा करायचा?
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे पाठवावेत:
पत्ता:
उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन खाते)
प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत,
६ वा मजला, पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,
पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व),
मुंबई – ४०००७५.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
महत्त्वाच्या सूचना:
- अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र (आधार / पॅन), पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक.
- अपूर्ण अथवा अयोग्य माहिती असलेले अर्ज नाकारले जातील.
- मुलाखतीबाबतची माहिती निवडलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल.
- ही भरती कंत्राटी स्वरूपात असून, भविष्यातील कायमस्वरुपी नोकरीची शाश्वती नाही.